Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 May, 2009

"गोवादूत'चा वर्धापनदिन ठरला एक पर्वणी!

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - "गोवादूत'चा वर्धापनदिन म्हणजे एक पर्वणीच. दिवस उजाडला तो विविधतेने नटलेल्या ४० पानी संग्राह्य विशेषांकाने तर दिवस मावळला तो अपूर्व अशा सुमधुर संगीत संध्येने. ही प्रतिक्रिया आहे "गोवादूत'संबंधी लोभ व्यक्त करण्यासाठी कार्यालयाला भेट दिलेल्या असंख्य हितचिंतकांची. अप्रतिम अशा एका शब्दात विशेषांकाची प्रशंसा सर्वांनीच केली. विश्वचरित्रकोशासारखा अवाढव्य उपक्रम हाती घेतलेले श्री. श्रीराम कामत यांनी तोंडभरून कौतुक करताना "एवढे उत्कृष्ट अंक कसे काय काढता बुवा' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करून "गोवादूत'ला दिलेली शाबासकीची थाप श्रमाचे फळ देऊन गेली.
सकाळी मुख्यालयात आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी राजकारण्यापासून सामान्य वाचकांनी रांग लावली होती. रात्रीपर्यंत कार्यालयाला भेट देऊन वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि अन्य हितचिंतकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. "गोवादूत'चे जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर यांनी सपत्नीक श्रीसत्यनारायणपूजेचे यजमानपद स्वीकारले होते. कर्मचारी आणि इतरांनी आपला सहभाग देत भजनाचा कार्यक्रम रंगविला. प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांनी प्रथम येत राजकारण्यांमध्ये पहिला क्रमांक मिळविला. त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर,दिलीप परूळेकर,महादेव नाईक,दामोदर नाईक, राजेश पाटणेकर, रमेश तवडकर,अनंत शेट, दयानंद मांद्रेकर,फ्रान्सिस डिसोझा, यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी आयोजित स्वागत समारंभाच्यावेळी वैष्णवी क्रिएशनस् मडगाव निर्मित "स्वरसंध्या' या सुगम संगीत मैफलीची सुरुवात अन्नपूर्णा साखरदांडे यांनी गायलेल्या सरस्वती स्तवनाने झाली. तिने गायिलेल्या "श्रावणात घननिळा बरसला', "त्या तिथे पलीकडे', "खंडे रायाच्या लग्नाला', "धिपाडी डिपांग' या गीतांना रसिकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. राजेश मडगावकर याच्या "देवाचीये द्वारी', "तू सप्त सुर माझे', "मन उधाण वाऱ्याचे' या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.
चारुता जोशी हिने सादर केलेल्या "स्वप्नातल्या कळयांनो', "चांदण्यात फिरताना', "मि वाऱ्याच्या वेगाने आले' तसेच, "जिवलगा कधी रे येशील तू' या गीतांनी या मैफलीला एका वेगळ्या उंचीवर नेले. गोमंतकाचे उदयोन्मुख नाट्यगीत व भक्तिगीत गायक सचिन तेली यांनी गायलेल्या ""जय शंकरा, "तारी मज आता', "श्री राम जय राम जय जय राम' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे निवेदन गोविंद भगत यांनी केले. या मैफलीसाठी संगीत साथ विष्णू शिरोडकर(कीबोर्ड), रोहित बांदोडकर (तबला), प्रकाश आमोणकर (ऑक्टोपेड) व दत्तराज म्हाळशी (हार्मोनियम) यांनी केली.
वैष्णवी क्रिएशनच्या बाल नृत्यांगना अप्रवी कामत, रुथा पर्रीकर, वैष्णवी पै काकोडे व कुंती मकवाना यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. या कार्यक्रमावेळीच "गोवादूत' छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पंडित कमलाकर नाईक यांच्याहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत सौ.वंदना गुरूदास प्रभू(पहिले),निरीक्षा सुदिन पै काणे(दुसरे) व कु.अक्षय सावर्डेकर (तिसरे) हरित चंद्रहास तळपणकर व नवदीप जॉन आगियार यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.

तनुजा नाईक खूनप्रकरणातील दोघेही आरोपी दोषमुक्त

"पोलिसांचा दिशाहीन तपास '
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) ः राज्यभर गाजलेल्या २२ वर्षीय तनुजा नाईक खून प्रकरणात पकडण्यात आलेल्या संशयिताच्या विरोधात ठोस पुरावे तसेच पोलिसांनी व्यवस्थित तपास काम केला नसल्याचा ठपका ठेवून रजनीशसिंग ऊर्फ राजू आणि रामसिंग या दोघांना जलद न्यायालयाचे न्यायाधीश प्रमोद कामत यांनी आज दोषमुक्त केले. यावेळी पोलिसांच्या तपासकामावर न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. या खून प्रकरणाचा पोलिसांनी केलेल्या तपासकामात कोणत्याही प्रकारचे ताळतंत्र आढळून आले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
खुनाच्या तब्बल चार वर्षानंतर राजू ऊर्फ रजनी सिंग (२४) या संशयित आरोपीला फोंडा पोलिसांनी मालीम बेती येथून ७ सप्टेंबर २००६ रोजी अटक केली होती. तसेच त्याच्या विरोधात पुरावेही गोळा केले होते. या प्रकरणातील आणखी एक संशयित रामसिंग हा मध्यप्रदेश येथील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच खून करण्यासाठी वापरण्यात आलेला कट्टा व चोरून नेलेली सोनसाखळी जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता.
मयत तनुजा नाईक हिचा दि. १५ जुलै २००२ रोजी पारंपाय मडकई येथील आस्थापनांतून घरी परतत असताना दिवसाढवळ्या गोळ्या घालून तिचा खून करण्यात आला होता. संशयित आरोपी राजू हा मालीम बेती येथे पान मसाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. तनुजा ज्या फॅक्टरीत कामाला होती त्याच फॅक्टरीत राजू काम करीत होता. नंतर ते काम सोडून त्याने बेती येथे आपला स्वतःचा पानमसाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्याच्याविरुद्ध संशय व्यक्त करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याचप्रमाणे फोंडा येथील चॅपेलमध्ये झालेल्या चोरीतही त्याचा सहभाग असल्याची दावाही पोलिसांनी त्यावेळी केला होता. फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक मोहन नाईक आणि पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी यांनी या आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली होती.
सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशाने हा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात होते. मात्र तनुजाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा मास्कोद, दोन कानातली रिंग्ज, अंगठी, डूल तसेच हातात असलेले घड्याळ आदी अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीच्या वस्तू सोडून पाच ते सहा हजार रुपये किमतीची फक्त गळ्यातील सोन्याची साखळीच त्यांनी का चोरली असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता. हा चोरीचा उद्देश नाही, तसेच पकडण्यात आलेले खुनी हे खरे खुनी नसल्याचा दावा त्यावेळी मडकई नागरिक कृती समितीने केला होता.

डॉ. मनमोहनसिंग आणि १९ कॅबिनेट मंत्र्यांचा पहिल्या टप्प्यात शपथविधी

आनंद शर्मा, हांडिक यांना बढती

नवी दिल्ली, दि. २२ - संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी आज दुसऱ्यांदा शपथ ग्रहण केली. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित या शानदार सोहळ्यात राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधानांसोबतच अन्य १९ मंत्र्यांनाही राष्ट्राधृयक्षांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
निर्धारित कार्यक्रमानुसार ठीक सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे आगमन झ्राले. राष्ट्रगीतानंतर डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पुकारले जाताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. सहा वाजून ३५ मिनिटांनी डॉ. मनमोहनसिंग यांनी शपथ घेतली.
पंतप्रधानांसोबत तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या संपुआच्या दोनच नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ममता बॅनर्जी यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारले जाताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून ममतांचे स्वागत केले. राष्ट्रपतींना ममतांनी अगदी वाकून नमस्कार केला.
या दोन मंत्र्यांव्यतिरिक्त प्रणव मुखर्जी, ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, एम. वीरप्पा मोईली, एस. जयपाल रेड्डी, कमल नाथ, वायलर रवी, श्रीमती मीरा कुमार, मुरली देवरा, कपिल सिब्बल, अंबिका सोनी, विजयकृष्ण हांडिक, आनंद शर्मा आणि सी. पी. जोशी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार, कमल नाथ आणि सी. पी. जोशी यांनी हिंदीतून शपथ घेतली. उर्वरित १७ मंत्र्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. एस. एम. कृष्णा यांचा या मंत्रिमंडळात नव्याने कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. गत मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले आनंद शर्मा आणि विजयकृष्ण हांडिक यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, आनंद शर्मा या राज्यसभा सदस्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून तीन कॅबिनेट मंत्री घेण्यात आले आहेत. त्यात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्याचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार असून त्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून ५० मंत्र्यांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते. गेल्या मंत्रिमंडळात एकूण ७९ मंत्री होते. यावेळी ही संख्या ७० च्या आसपास असेल, असे कॉंग्रेस गोटातून सांगण्यात येत आहे.
दोन-तीन दिवसात खातेवाटप
कॅबिनेट मंत्र्यांचे खातेवाटप दोन-तीन दिवसात केले जाईल, अशी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांना दिली.

नाराज फारुख अब्दुल्ला राजी

केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो पहिला विस्तार करण्यात येईल, त्यात फारुख अब्दुल्ला यांचा समावेश केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिले असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी यांनी आज येथे पत्रकारांना दिली. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार मंगळवार, २६ मे रोजी करण्यात येणार असून त्यावेळी पाच मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
२६ मे रोजी करण्यात येणाऱ्या विस्तारात फारुख अब्दुल्ला यांच्यासह मुकुल वासनिक व विलास मुत्तेमवार यांचाही समावेश केला जाण्याची शक्यता सूत्राने बोलून दाखविली.
फारुख अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून काल रात्री राजधानी नवी दिल्लीत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्यामुळे फारुख अब्दुल्ला नाराज झाले असल्याचेही वृत्त आले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांना बोलावून घेतले आणि पुढील विस्ताराच्या वेळी समावेश करून घेण्याचे आश्वासन दिले, असेही ओमर म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सने कोणत्याही खात्यासाठी आग्रह धरला नव्हता. फक्त एवढीच माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता की, पंतप्रधानांसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा समावेश आहे की नाही, असे ओमर यांनी कालच येथे सांगितले होते.
दरम्यान, पंतप्रधानांसोबत शपथग्रहण करण्याची आपल्याला संधी नसल्याचे समजताच फारुख अब्दुल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पथकासोबत दक्षिण आफिकेला रवाना झाले. हे पथक दक्षिण आफिकेत आयोजित आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्याचा आनंद घेणार आहे.
पुढील मंगळवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता असून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्यासह द्रमुकच्याही सदस्यांचा त्यात समावेश केला जाण्याची शक्यता आहे, अन्य एका सूत्राने व्यक्त केली.
नऊ खात्यांची मंत्रिपदं मिळावीत म्हणून द्रमुकने काल आग्रह धरला होता. पाच कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रिपदे मिळावीत, हा द्रमुकचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्यानंतर द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी चेन्नईला परतले होते. दरम्यान, द्रमुकने संपुआ सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि संपुआतर्फे देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी चेन्नईत बैठक आयोजित करण्याचे ठरले होते.
द्रमुकच्या नेत्यांचे मन वळविण्यासाठी कॉंग्रेसने गुलाम नबी आझाद यांना चेन्नईला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टाईत आझाद यांना यश आले आणि द्रमुकने मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे ठरविले तर मंगळवारी होणाऱ्या पहिल्या विस्ताराच्या वेळी त्यांचेही सदस्य शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Friday 22 May, 2009

द्रमुक-कॉंग्रेस बोलणी फिसकटली

मंत्रिपदाच्या संख्येवरून वाद, द्रमुकचा आता सरकारला बाहेरून पाठिंबा

नवी दिल्ली, दि. २१ - डॉ.मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीस २४ तासांहून कमी वेळ राहिला असतानाच, मंत्रिपदाच्या संख्येबाबत आज द्रमुकने आक्रमक भूमिका घेत मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. आमचा पक्ष सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, असे द्रमुकतर्फे टी.आर.बालू यांनी जाहीर केले. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनीही मंत्रिपदांच्या संख्येबाबतची बोलणी फिसकटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. द्रमुकच्या अवाजवी मागण्या मान्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील कृती ठरविण्यासाठी द्रमुकने आपल्या कार्यकारिणीची तातडीचे बैठक चेन्नई येथे बोलाविली आहे.
मंत्रिपदाच्या संख्येबाबत कॉंग्रेसने सादर केलेला फॉर्मुला आपल्याला मान्य नसल्याचे श्री.बालू यांनी सांगितले.पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी द्रमुकचे अध्यक्ष एम.करूणानिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बालू यांनी मंत्रिपदाच्या संख्येबाबत बोलणी फिसकटल्याचे सांगून, आपला पक्ष एकही मंत्रिपद स्वीकारणार नाही, असे सांगितले. २००४ मध्ये असलेला फॉर्मुला पुन्हा लागू करावा, अशी मागणी द्रमुकने केली होती,असे बालू यांनी सांगितले. त्यावेळी तीन खासदारांमागे द्रमुकला एक मंत्रिपद देण्यात आले होते. भूपृष्ठ वाहतूक, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान व पर्यटन अशा खात्यांची मागणी द्रमुकने केली होती. तीन कॅबिनेट मंत्रिपदे, तीन किंवा चार राज्यमंत्रिपदे मिळावीत अशी मागणी द्रमुकने केली आहे. ए.राजा, टी.आर.बालू, दयानिधी मारन यांच्याव्यतिरिक्त करुणानिधीचे पुत्र अझागिरी व कन्या कनीमोझी यांनाही मंत्रिपदे मिळावित अशी मागणी करण्यात आली होती. २००४ सारखी स्थिती आता राहिलेली नाही, त्यामुळे द्रमुकची मागणी स्वीकारणे अशक्य असल्याचे कॉंग्रेसने द्रमुक नेत्यांना सांगितले आहे. यावेळी कॉंग्रेसजवळ स्वतःचे २०६ सदस्य आहेत. द्रमुकची संख्या १८ आहे. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार द्रमुकला दोन कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे दिली जाऊ शकतात. तृणमल कॉंग्रेसने केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद मागितल्याचे उदाहरण कॉंग्रेस नेते देत आहेत. तृणमल कॉंग्रेसला तीन कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी कॉंग्रेसने दाखविली असून, रेल्वे मंत्रिपद ममता बॅनर्जी यांना मिळण्याची शक्यता आहे.

"कदंब'नंतर आता "साबांखा'च्या कर्मचाऱ्यांचाही संपाचा इशारा

२५ पासून पाणीपुरवठ्यावर परिणाम शक्य

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेनंतर आता सार्वजनिक बांधकाम खात्यातील सुमारे १६०० कंत्राटी कामगारांनी येत्या २५ मे पासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस सरकारला जारी केली आहे.सा.बां.खात्याच्या पाणी विभागात हे बहुतेक कामगार काम करीत असल्याने ते संपावर गेल्यास संपूर्ण राज्याचा पाणी पुरवठा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कदंब महामंडळाचे चालक व अन्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेतर्फे येत्या ३० मे पर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्यास संपावर जाण्याची नोटीस जारी केली असतानाच आता सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी कामगारांनीही संपाचा निर्णय घेतला आहे.कामगार आयुक्तांसमोर सरकारतर्फे मान्य करण्यात आलेल्या अटींची पूर्तता करण्यात सरकारला अपयश आल्याने संपाचा निर्णय घेतल्याची माहिती कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली.यापूर्वी पगारात वाढ करण्याच्या मागणीवर या सर्व कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हस्तक्षेप करून सा.बां.खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांच्याबरोबर संयुक्त बैठक बोलावून याबाबत तोडगा काढला होता.या सर्व कामगारांच्या पगारात १ जानेवारी २००८ पासून वाढ करण्याचे मान्य करण्यात आले होते तसेच "समान काम,समान वेतन' हा कायदाही लागू करण्याची तयारी सरकारतर्फे दर्शविण्यात आली होती.सरकारकडे प्रलंबित असलेला वार्षिक महागाईभत्ताही देण्याचे मान्य करून थकबाकीसह बोनसही देण्याची तयारी सरकारने दाखवली होती.सा.बां.खात्यात नोकरभरती करताना या कंत्राटी कामगारांना प्रामुख्याने प्राधान्य देण्याचीही अट यावेळी मान्य करून घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गेली दहा ते पंधरा वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या कामगारांची वरिष्ठ यादी तयार करण्यासही मान्यता देण्यात आली होती. या विविध मागण्यांबाबत कामगार आयुक्तांसमोर तयारी दर्शवून आता त्यातील एकही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आली नसल्याने संपावर जाण्यावाचून पर्याय नसल्याचे श्री.फोन्सेका म्हणाले. दरम्यान,कामगार आयुक्तांनी उद्या २२ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण केले असून या कामगारांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी शेवटची संधी दिली आहे.

ढवळीकरांना तातडीने मंत्रिमंडळातून काढा

कॉंग्रेस प्रवक्ते खलप यांची मागणी

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून तातडीने डच्चू द्यावा,अशी मागणी माजी केंद्रीय कायदामंत्री तथा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड.रमाकांत खलप यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत सुदिन व दीपक या ढवळीकर बंधूंनी स्वतःच्या मगो पक्षाचा घात केलाच; परंतु कॉंग्रेसविरोधातही त्यांनी काम केले,असा ठपकाही खलप यांनी ठेवला.
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॉंग्रेस भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केला. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर व इतर पदाधिकारी हजर होते. कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी धाडसाने "एकला चलो रे' चा नारा लावला.उत्तर प्रदेशात "संपुआ'चे घटक असलेल्या प्रादेशिक पक्षांकडून कॉंग्रेसला वाकुल्या दाखवण्याचे प्रयत्न सुरू होताच त्यांनी या पक्षांशी काडीमोड घेतला व स्वबळावर उत्तर प्रदेशात २१ जागा मिळवल्या. गोव्यातही भविष्यात कॉंग्रेसला सत्ता शाबूत ठेवायची असेल तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसेतर नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे ऍड.खलप म्हणाले.
सध्याच्या स्थितीत कॉंग्रेसला ढवळीकर बंधूंच्या कुबड्यांची अजिबात गरज नाही. हे दोघेही भाजपचे हस्तक या नात्याने राजकारणात वावरत आहेत,अशी खरपूस टीकाही ऍड.खलप यांनी केली. कॉंग्रेस पक्षाने सत्तरी,डिचोली,थिवी आदी भागांत आपली राजकीय पोकळी भरून काढावी व या भागात पुन्हा संघटनात्मक कार्याला प्रारंभ करावा. विरोधी भाजप मतदारसंघांसह सरकारला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसेतर मतदारसंघावरही नजर ठेवावी,असेही खलप म्हणाले.
मंत्रिमंडळ फेररचनेस मुख्यमंत्र्यांचा नकार
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार करण्याचा सध्याच्या स्थितीत प्रश्नच उद्भवत नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. केंद्रात कॉंग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाचा लाभ आता गोव्याला करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून विविध योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार,असे कामत म्हणाले. मंत्रिमंडळ फेररचनेबाबत सध्या ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत, त्यात तथ्य नसून आपण त्या दृष्टीने विचारच केला नसल्याचा खुलासा त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्याविरोधात पक्षविरोधी काम केल्याची कोणतीही तक्रार आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याची गरजच काय,असाही सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

कॅसिनोंसाठी नियामक मंडळाची गरज

गृहखाते अस्थायी समिती बैठकीची शिफारस

मडगाव, दि.२१ (प्रतिनिधी): गृहखात्याच्या अस्थायी समितीच्या आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत झालेल्या बैठकीत कॅसिनोंवर गंभीर चर्चा केली गेली व लोकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून सध्या अस्तित्वात असलेल्या कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यासाठी व या व्यवसायाच्या नियमनासाठी एक नियामक मंडळ स्थापन करण्याची शिफारस केली गेली.
अशा मंडळाचा तपशील ठरविण्यासाठी आजच्या बैठकीने संबंधित कॅसिनोंना दिलेल्या परवान्यांची फाईल मागविण्याचा निर्णय घेतला. समितीचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की त्यामुळे सरकारने नेमक्या किती कॅसिनोंना परवाने दिले ते तरी उघड होईल तसेच या कॅसिनोंव्दारा नेमका किती महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होतो ते उघड होईल.
सरकार आपण "ऑफ शोर कॅसिनों'ना परवाने दिल्याचा जो दावा करीत आहे तो तकलादू असल्याची टिप्पणी पर्रीकर यांनी केली व म्हटले की ऑफ शोर च्या व्याख्येत तलाव, सरोवर आदींही मोडतात व कॅसिनोवाले सध्या सरकारच्या कृतीला आव्हान देण्याची जी भाषा करीत आहेत ते पाहाता सरकारची बाजू कमजोर वाटते, यासाठी अशा नियमन मंडळाची गरज आहे. एका प्रश्र्नावर ते म्हणाले की आणखी कॅसिनो हवेत की नकोत हा मुद्दा नंतरचा, जे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणणे ही आजची खरी गरज आहे.

Wednesday 20 May, 2009

'कदंब'ची आजपासून पणजी-हैदराबाद सेवा

पणजी, दि. १९ : कदंब वाहतूक महामंडळाने उद्या २० मेपासून खास लोकाग्रहास्तव पणजी-हैदराबाद ही आरामदायी बससेवा सुरू केली आहे. ही बस पणजीहून दुपारी ३.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता हैदराबादेत पोहोचेल आणि हैदराबादेतून दुपारी ३.३० वाजता सुटून पणजीत सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे.
गोव्यातील लोक तसेच विद्यार्थी यांचा उच्च शिक्षणासाठी व अन्य कारणाने हैदराबादकडे वाढत चाललेला ओढा लक्षात घेऊन कदंब महामंडळाने ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी आगाऊ आरक्षणाची सोय "कदंब'च्या सर्व आरक्षण केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. तसेच आरक्षणाची सुविधा शर्मा ट्रॅव्हल्स - पणजी (मोबाईल ९८२३०७५७२५) व भानू ट्रॅव्हल्स - कळंगुट (मोबाईल ९९२२०५२५३४) या "कदंब'च्या अधिकृत एजंटांकडेही आरक्षण करता येईल. तसेच हैदराबाद येथे डेक्कन ट्रॅव्हल्स (मोबाईल ०९३९१०२४२६६), सदर्न ट्रॅव्हल्स (मोबाईल ०९८२००६५८६१) व श्रीभारती ट्रॅव्हल्स (मोबाईल ०९४४०४८०६४४) यांच्याकडेही आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन "कदंब'चे उपसरव्यवस्थापक संजय घाटे यांनी केले आहे.

'गोवादूत'छायाचित्र स्पर्धेत वंदना गुरुदास प्रभू पहिल्या

बक्षीस वितरण २२ रोजी
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) : दै. "गोवादूत'तर्फे आयोजित स्व.सुशांत नाईक स्मरणार्थ छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सौ. वंदना गुरुदास प्रभू यांना पहिले बक्षीस (५ हजार रु.) मिळाले आहे. ३ हजारांचे दुसरे बक्षीस निरीक्षा सुदिन पै काणे (मेरशी) यांना, तर तिसरे बक्षीस (२००० रु.) कु. अक्षय सावर्डेकर याला मिळाले आहे. उत्तेजनार्थ प्रत्येकी १ हजारांची बक्षिसे हरित चंद्रहास तळपणकर व नवदीप जॉन आगियार यांना मिळाली आहेत.
"गोवादूत'चे लाडके छायाचित्रकार सुशांत नाईक यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजिली जाते. यावर्षीही या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. "गोवादूत'च्या वर्धापनदिनी म्हणजेच २२ मे रोजी संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान आयोजित स्वागत समारंभात बक्षीस वितरण केले जाणार आहे. यावेळी विजेत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लंका आणि लिट्टे

१९७२ ते २००७... ३७ वर्षे, हजारो लोकांचे बळी, लाखो लोकांचे हाल, सशस्त्र संघर्ष आणि अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार...तो निर्धार संपलेला दिसत नाही आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम्चा (लिट्टे) सर्वेसर्वा वेलुपिल्लई प्रभाकरनचा आता अंत झाल्याचा श्रीलंकेच्या लष्कराचा दावा आणि तो अद्याप जिवंत असल्याचा प्रतिदावा ही दोन टोके सुद्धा कायम आहेत. ३७ वर्षांचा रक्तरंजित संघर्ष एका वळणावर येऊन थांबलाय् एवढे मात्र खरे. प्रभाकरन खरोखर जिवंत असेल तर हा लढा पुनरुज्जीवित होऊ शकतो. मात्र, ज्या पद्धतीने श्रीलंकेच्या लष्कराने लिट्टेचे कंबरडे मोडले, त्यावरून लिट्टेकडे आता पूर्वीसारखी ताकद असणार नाही. प्रभाकरन खरोखर मारला गेला असेल तर मात्र लिट्टेच्या पुनरुज्जीवनाची सूतराम शक्यता नाही. श्रीलंकेत शांती सेना पाठविण्याच्या निर्णयासाठी प्रभाकरनने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जी शिक्षा ठोठावली होती, त्या तुलनेत प्रभाकरनचे मरण हे वीराचेच ठरणार आहे हे मान्य केले तरी त्याला असाच मृत्यू येणार हे अपेक्षितच होते. सात वर्षांपूर्वी प्रभाकरनने अखेरचे दर्शन दिले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत त्याला राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल विचारले होते तेव्हा "इट्स अ ट्रॅजिक इन्सिडंट' एवढेच तो म्हणाला होता. परंतु, ज्या निर्घृणपणे राजीव गांधी यांना ठार करण्यात आले होते, त्याने सारे जग हादरले होते. राजीव गांधींना संपविण्याचे कारस्थान लिट्टेचे आणि त्यातही प्रभाकरनचेच होते, हे नंतरच्या काळात स्पष्ट झाले. राजीव गांधी यांची हत्या ही प्रभाकरनच्या रक्तरंजित कारवायांमधील एक घटना होती. रक्तपात प्रभाकरनसाठी नवा नव्हताच. तब्बल तीस वर्षे त्याने लंकेच्या छातीवर अनेकांचे रक्त सांडविले. अनेक प्रकारच्या वाटाघाटी, करार, युद्धबंदी हे सारे करून सुद्धा लिट्टेचा संघर्ष थांबत नव्हता. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीलंकेच्या सरकारने राष्ट्रीय निर्धार दाखवत लिट्टेचे कंबरडे मोडले. प्रभाकरन जिवंत असेल तरी आता लिट्टेला संपविणे श्रीलंकेच्या हातात आहे. १९७२ सालापासून सुरू असलेल्या अतिरेकी कारवायांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात श्रीलंकेच्या लष्कराला यश आले आहे. त्यामुळे आता श्रीलंकेत शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा करणे शक्य आहे. अर्थात, त्यासाठी श्रीलंकेच्या अल्पसंख्य-बहुसंख्य धोरणात काही बदल होणे आवश्यकच आहे. ते न झाल्यास लिट्टेसारखी संघटना पुन्हा उभी होईल, असे मानण्याचे कारण नसले तरी तामिळांचा संघर्ष पूर्णतः थांबणार नाही. लिट्टेचा उदय तामिळी अल्पसंख्यकांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या व राष्ट्रीय प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यात आले असल्याच्या भावनेतूनच झाला होता, हे यासंदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे.
१९७२ साली स्थापन झालेल्या तामिळी तरुण तुर्कांची तमिल न्यू टायगर्स (टीएनटी) ही संघटना ते २००० नंतर हवाईहल्ले व पाणबुड्यांच्या मार्गाने लढणारी लिट्टे नावाची दहशतवादी संघटना हा प्रवास ३७ वर्षांचा. या प्रवासात प्रभाकरन कुठेच थांबला नाही. तामिळांचे स्वायत्त राष्ट्र ही त्याची मागणी होती. त्यावरही त्याने कधीच तडजोड स्वीकारली नाही. १९७६ साली टीएनटीतूनच लिट्टे नावाची संघटना आकाराला आली. ७८ साली प्रभाकरनने पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली. तामिळांची स्वतंत्र मातृभूमी, तामिळांचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व आणि तामिळांना स्वयंनिर्णयाचा अधिकार ही आमची त्रिसूत्री असल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले आणि तेव्हापासून संघर्ष सुरू झाला. संघर्षाचा प्रारंभ झाला तो जाफन्यात. १९८३ मध्ये तिथे १३ सैनिकांना लिट्टेने ठार केले. तामिळांमध्येही काही प्रमाणात अंतर्गत संघर्ष होता. तो संपविण्यासाठी तीन वर्षे नियोजन करून १९८६ मध्ये लिट्टेने सर्वांत मोठ्या स्पर्धक गटाला संपविले आणि वेलुपिल्लई प्रभाकरनची "लंकेतील तामिळांचा तारणहार' अशी प्रतिमा बनली. १९८७ साली त्याने श्रीलंकेच्या ईशान्येत तैनात असलेल्या भारतीय सैन्याशी संघर्ष केला. त्यात शेकडो सैनिक ठार झाले आणि सैन्याने माघार घेतली. १९८९ मध्ये त्याने तत्कालीन अध्यक्ष रणशिंगे प्रेमदासा यांच्याशी चर्चा केली. परंतु, पुढच्याच वर्षी म्हणजे ९० साली जाफना द्विपकल्पावर कब्जा मिळवून तेथे समांतर सरकार स्थापन केले. पुढे लिट्टेने सहाशे पोलिसांची कत्तल केली. १९९१ मध्ये त्याने रंजन विजेरत्ने या संरक्षण मंत्र्याला संपविले आणि त्याच वर्षी राजीव गांधींचीही मानवी बॉम्ब वापरून हत्या केली. श्रीलंकेत भारतीय शांति सेना पाठविण्याच्या राजीव गांधींच्या निर्णयाचे उट्टे त्याने राजीवजींना संपवूनच काढले. राजीव गांधी यांच्या हत्येचे कवित्व संपत नाही तोच, १९९३ मध्ये राष्ट्राध्यक्ष प्रेमदासा यांना लिट्टेने ठार मारले. त्यानंतरच्या काळात ९४-९५ मध्ये अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांच्याशी चर्चा करण्यास मान्यता दिली आणि नंतर जाफन्यावरील लिट्टेचा ताबा सुटला. परंतु, पुढच्याच वर्षी त्याने लष्करी छावणीवर हल्ला करून १२०० सैनिक व पोलिसांची कत्तल केली. सरकार वाटाघाटीतून मार्ग काढू पाहत होते आणि दरम्यानच्या काळात लिट्टेच्या कारवाया आणि प्रभावक्षेत्र वाढत होते. १९९८-९९ पर्यंत लंकेच्या ईशान्येतील बराच मोठा भाग लिट्टेच्या छत्रछायेखाली आला होता. २००१ मध्ये श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लिट्टेने हल्ला केला. हे प्रकरण अतिशय गंभीर होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षात मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यामुळे २००२ मध्ये लिट्टे व श्रीलंकेचे सरकार यांच्यात शांततेचा करार झाला. परंतु, असा करार प्रभाकरनच्या प्रकृतीला मानवणारा नव्हता. २००३ मध्येच त्याने हा करार आपल्याला मान्य नाही, असे स्पष्ट करून टाकले. लिट्टेत त्यामुळे मतभेद निर्माण झाले. करुणा नावाचा त्याचा एक साथीदार हजारो बंडखोरांना घेऊन बाहेर पडला... ते साल होते २००४. परंतु, प्रभाकरनच्या "लिट्टे'ला थांबणे जणू माहितीच नव्हते. तिच्या कारवाया सुरूच राहिल्या. २००५ मध्ये लिट्टेने लंकेच्या परराष्ट्र मंत्र्याला ठार केले, २००६ मध्ये लष्करप्रमुखाला ठार करण्याचा प्रयत्न केला, २००७ मध्ये कोलंबोवर हवाई हल्ला चढविला...आणि इथे मात्र श्रीलंकेच्या सरकारची सहनशक्ती संपली. आता काहीही झाले तरी लिट्टेला नामशेष केल्याविना थांबणार नाही, असे सरकारने जाहीर केले आणि लष्कराला त्यासाठी पूर्णतः मोकळीक देण्यात आली. लष्कराने चारही बाजूंनी चढाई करून लिट्टेला जेरबंद केले आणि पार पांगळे करून टाकले. प्रभाकरन ठार झाला नसेल तर तो ठार होईल आणि ठार झाला नाही तरी तो पुन्हा पूर्ववत लिट्टे उभी करू शकणार नाही, एवढी कामगिरी श्रीलंकेच्या लष्कराने केलेली आहे. त्यामुळेच आम्ही आता शस्त्रे खाली ठेवत असल्याची बतावणी लिट्टेने सुरू केलेली आहे आणि त्याच वेळी प्रभाकरनसह त्याचे बिनीचे साथीदार अद्याप जिवंत असल्याचा दावाही केला जात आहे. लिट्टेच्या म्होरक्यांचे मृतदेह ताब्यात आल्यावर आणि त्यांच्या डीएनए चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच प्रभाकरनच्या मृत्यूबद्दल ठामपणे सांगता येणे शक्य आहे. ठार झाल्याच्या अफवा ओसामा बिन लादेनबद्दलही उठल्या होत्या. मात्र, ओसामा आणि प्रभाकरन यांच्यातला फरक असा की, ओसामाच्या संघटनेचे अद्याप कंबरडे मोडलेले नाही. लिट्टेचे मात्र कंबरडेच मोडले गेले आहे. लंकेतील तामिळबहुल भागात लिट्टे म्हणजे समांतर सरकार होते. समांतर सरकार चालविणारी मातब्बर संघटना ते जीव वाचवत पळत सुटलेल्यांची संघटना ही अवस्था लष्करी कारवाईमुळे लिट्टेची झाली आहे. एकेकाळी, अगदी अलीकडच्या काळापर्यंत, लिट्टेचे तामिळ इलम् पोलिस दल, शिक्षण विकास मंडळ, लष्करी प्रबोधिनी, व्हॉईस ऑफ टायगर्स ही प्रसारवाणी, राष्ट्रीय दूरचित्रवाहिनी, न्यायालये, विधी व न्याय विभाग, मध्यवर्ती बॅंक, कस्टम्स एजंसी, असा सगळा, एखाद्या सरकारी यंत्रणेला शोभेल असा, लवाजमा लिट्टेने उभा केला होता. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्कही वाढविला होता. त्यामुळे लिट्टेची ताकद हा श्रीलंकेच्या शासकांपुढचा सर्वांत मोठा प्रश्न होता. प्रारंभी टीएनटीला श्रीलंकेतील सिंहली या बहुसंख्यकांच्या विरोधात संघर्ष करणारी संघटना, असे स्वरूप होते. लंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पसंख्याकांचे हित राखले जात नाही, असा त्यांचा प्रमुख मुद्दा होता. अल्पसंख्याक समुदाय म्हणून लंकेतील तामिळींबद्दल कुणालाही सहानुभूती वाटावी. लंकेत सिंहली ७४ टक्के आहेत. त्या तुलनेत प्राचीन काळापासून त्या बेटावर राहणारे तामिळ बरेच कमी. तरीही त्यांच्या स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न प्रभाकरनने पाहिले. स्वप्न पाहण्यात गैर नव्हते. परंतु, त्यासाठी लिट्टेने जो मार्ग पत्करला तो कोणतेच सरकार खपवून घेऊ शकले नसते. तरीही लंकेत ३० वर्षे ते खपवून घेतले गेले. प्रभाकरन अत्यंत निर्दयी होता. अत्यल्प शिकलेला आणि सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या प्रभाकरनने आत्मघातकी पथकांच्या माध्यमातून जगाला अनेक धक्के दिले. लिट्टेने किमान लाखभर तरी माणसे मारली असावीत, असा अंदाज आहे. त्यात जसे सिंहली होते, तसे तामिळही होते. राजीव गांधींसारखे भारतीयही होते. प्रभाकरनने कधीही आपल्या मागणीला तात्त्विक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, अल्पसंख्यकांची एक संघटना एका स्वतंत्र देशाच्या सरकारपुढे आव्हान उभे करू शकते, हे साऱ्या जगाने लिट्टेच्या निमित्ताने पाहिले. जगाने हेही पाहिले की, कोणत्याही अस्मितेच्या नावावर बहुसंख्याक समुदायाला वेठीस धरू पाहणाऱ्यांविरुद्ध सत्तेने निर्धारपूर्वक पावले उचलली की काय घडू शकते!

डॉ.मनमोहनसिंग यांचा शुक्रवारी शपथविधी

संसदीय पक्षनेतेपदी एकमताने निवड
मंत्र्यांची नावे आजच्या बैठकीत ठरणार
सोनिया गांधी संसदीय पक्षाच्या अध्यक्ष
प्रणव मुखर्जी लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते
पंधराव्या लोकसभेचे सत्र २ जूनपासून
माणिकराव गावित हंगामी सभापती?

नवी दिल्ली, दि. १९ : कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज नवी दिल्ली येथे झाली. त्यात डॉ. मनमोहनसिंग यांची कॉंग्रेस संसदीय पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. नवे पंतप्रधान म्हणून ते शुक्रवारी शपथ घेणार आहेत. उद्या बुधवारी संपुआची बैठक होणार असून, त्यात मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.
कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. तर, लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांची निवड करण्यात आली.
लोकसभेचे पहिले सत्र २ जूनपासून
दरम्यान, पंधराव्या लोकसभेचे पहिले सत्र २ जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी नव्या सदस्यांना शपथ दिली जाईल आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
याच सत्रात सभागृहातील एका ज्येष्ठ सदस्याची हंगामी सभापती म्हणून निवड केली जाणार आहे. हे सभापती मग सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीकडे लक्ष देतील. नवव्यांदा लोकसभेत पोहोचलेले कॉंग्रेसचे माणिकराव गावित यांची हंगामी सभापती म्हणून निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना संसदीय कार्याचा २७ वर्षे आठ महिन्यांचा अनुभव आहे.
७५ वर्षीय गावित हे उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार या आदिवासींसाठी राखीव मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. केंद्रातील संपुआच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते.
गावित यांच्यानंतर १५ लोकसभेत जे अनुभवी नेते आहेत, त्यात माकपचे वासुदेव आचार्य(२७ वर्षे पाच महिने), कॉंग्रेसचे कमलनाथ(२६ वर्षे २ महिने) आणि कॉंग्रेसचेच विलास मुत्तेमवार(२४ वर्षे ११ महिने) यांचा समावेश आहे. प्रथेनुसार लोकसभेचे पहिले अधिवेशन हे अल्पकालीन असते. याच अधिवेशनात अर्थसंकल्प मांडायचा का, याबाबत नवे सरकार निर्णय घेऊ शकते.

सुशीलाचाही खुनी महानंदच! एकूण संख्या १०

फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी) : सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने अखेर दहाव्या खुनाची कबुली दिली असून मळेभाट कुडका येथील कु. सुशीला तानू फातर्पेकर हिचा ऑक्टोबर २००७ मध्ये रायबंदर येथे नदीच्या किनाऱ्यावर खून केल्याची कबुली दिली आहे.
इस्पितळात सुशीलाशी झालेल्या ओळखीचे रूपान्तर महानंद याने मैत्रीत केले. सुशीला हिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या कुटुंबीयांना दाखविण्यासाठी घरातून दागिने घालून येण्याची सूचना केली. कु. सुशीला घरातून जाताना सोन्याची काकणे, सोन्याचा हार, सोनसाखळी आदी सुमारे पन्नास हजार रुपयांचे दागिने घातले होते. आपल्या घरच्यांना दाखविण्याच्या बहाण्याने महानंद याने सुशीला हिला रायबंदर येथे नेले आणि तेथे तिचा गळा आवळून खून केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या सुशीला हिच्या खून प्रकरणाचा तपास आगशी पोलीस करणार आहेत, असे उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी सांगितले. सध्या याप्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर आहे. सुशीलाचा खून करण्यात आलेली जागा, तिचा मृतदेह कुठे टाकला व इतर बाबींची पडताळणी केली जात आहे, असेही श्री. डायस यांनी सांगितले. गोव्यातील विविध भागातून बेपत्ता महिला, युवती संबंधी माहिती फोंडा पोलिसांना मिळत आहे. महानंदची खून करण्याची पद्धतीला मिळती जुळते प्रकरण असल्यास त्याची चौकशी केली जात आहे, असेही उपअधीक्षक श्री. डायस यांनी सांगितले.
कु. सुशीला हिला तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत. सुशीला ही सर्वांत लहान होती. तिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. घरातून जाताना सोन्याचे दागिने आणि पासबुक घेऊन गेली होती, असे तिची मोठी बहीण सौ. पिरू चंद्रू कानोलकर (करमळी) हिने सांगितले.
कुर्टी येथील कु. योगिता नाईक खून प्रकरणाच्या तपासासाठी घेण्यात आलेला महानंद नाईक याचा चौदा दिवसांचा रिमांड २० मे ०९ रोजी समाप्त होत आहे. त्याला २० रोजी येथील न्यायालयात उभा करून तरवळे येथील कु.दर्शना नाईक हिच्या खून प्रकरणी रिमांड घेतला जाणार आहे. कु. दर्शना हिचा बांबोळी येथे खून केल्याची कबुली महानंद नाईक याने दिली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महानंद नाईक याने आत्तापर्यंत दहा खुनांची कबुली दिलेली आहेत. त्यातील काहींचे मृतदेह सापडले आहेत. तर काहींचे मृतदेह पाण्यात टाकल्याचे संशयित महानंद नाईक याने सांगितले आहे. योगिता नाईक, दर्शना नाईक या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर सुनिता गांवकर, निर्मला घाडी, सूरत गांवकर, अंजनी गांवकर, वासंती गावडे, केसर नाईक, नयन गांवकर यांच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागलेला नाही. केरये खांडेपार येथे एक मृतदेह टाकण्यात आलेल्या ठिकाणी मानवी हाडे आढळून आली आहेत.
क्रूरकर्मा महानंद नाईक प्रकरणाच्या तपासाकडे लोकांचे सुध्दा लक्ष लागलेले आहेत. याप्रकरणातील संशयित महानंद नाईक याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी सुध्दा याप्रकरणामध्ये कच्चे दुवे राहून नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील तपास करीत आहेत.
------------------------------------------------------------
सुशीलाशी इस्पितळात ओळख
मळेभाट कुडका येथील कु.सुशीला तानू फातर्पेकर ही युवती २४ ऑक्टोबर ०७ पासून बेपत्ता आहे. यासंबंधी आगशी पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल झालेली आहे. कु. सुशीला ही मिरामार पणजी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. संशयित महानंद नाईक याची मुलगी आजारी पडल्याने याच इस्पितळात उपचारासाठी काही दिवस दाखल करण्यात आले होते. त्यावेळी महानंद नाईक याची सुशीला हिच्याशी ओळख झाली.

तोतया पोलिसाला पणजीत अटक

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) : पोलिस असल्याची बतावणी करून दूरध्वनीद्वारे लुटणाऱ्या तोतया पोलिसाला आज पणजी पोलिसांनी गजाआड केले. या तोतया पोलिसाचे नाव आदिल अब्दुल शेख (वय २४ रा. सांत इनेज) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सांत इनेज येथे तो "टेलिफोन बूथ' चालवत असून त्याला भा.दं.स ३८५, ४१९ व ५०७ कलमांनुसार अटक करण्यात आली आहे.
पोलिस असल्याचे सांगून आदिल हा आपल्याकडे पाचशे रुपये व एक मोबाईल मागत असल्याची तक्रार सांताक्रुज येथे राहणाऱ्या अजिंक्य रजपूत (१९) याने दाखल केली होती. प्राप्त माहितीनुसार सहा महिन्यापूर्वी आदिल व अजिंक्य याची तोंडओळख झाली होती. त्यानंतर अजिंक्य याच्या मोबाईलवर दूरध्वनी यायला लागले. "मी पोलिस कंट्रोल रूममधून समीर बोलत असून उद्या सकाळी सांताक्रुज येथील "ए आर. बेकरी'त पाचशे रुपये आणून ठेव, नाही तर,तुला खोट्या तक्रारीखाली अटक करू,' अशी धमकावणी दिल्यानंतर घाबरलेल्या अजिंक्यने त्या बेकरीत जाऊन १ मे रोजी पाचशे रुपये ठेवले. त्यापूर्वी आदिलने त्या बेकरीत जाऊन एक तरुण याठिकाणी पाचशे रुपये आणून देणार असल्याची माहिती दिली होती. सायंकाळी येऊन त्याने ते पाचशे रुपये घेतले. मग १७ मे रोजी अजिंक्यला पुन्हा दूरध्वनी आला. यावेळी आदिलने मोबाईलची मागणी केली. हा मोबाईल सांत इनेज येथे एका नाविकाकडे आणून ठेवायला त्याला सांगण्यात आले. त्या नाविकाला आदिलने आधीच जाऊन एक तरुण याठिकाणी माझ्या नावाने मोबाईल ठेवणार असल्याचे सांगितले. मोबाईल मिळाल्यावर आदिलने अजिंक्यला दूरध्वनी करून आपल्या मागण्यांचा सपाटा सुरूच ठेवला. अखेर अजिंक्यने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. त्याचे वडील या पोलिसाला शोधत पोलिस कंट्रोल रूमात पोहोचले. तेथील समीर नावाच्या पोलिसाकडे चौकशी केली असता आपण असे दूरध्वनी केले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
याची पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अजिंक्य याला येत असलेल्या दूरध्वनीची माहिती मिळवली असता, हे दूरध्वनी सांत इनेज येथील एका टेलिफोन बूथवरून येत असल्याचे उघड झाले. त्याबरोबर आदिल याला पोलिसांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोतया पोलिस बनून लुटणारा हा तरुण खऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडला. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक विजय चोडणकर करत आहेत.

Tuesday 19 May, 2009

लष्कराच्या हल्ल्यात प्रभाकरन् ठार, श्रीलंकेच्या लष्कराचा दावा, आज अधिकृत घोषणा

कोलंबो, दि. १८ : श्रीलंकेत स्वतंत्र तामिळ राज्याच्या मागणीसाठी अतिशय निर्दयपणे चळवळ चालविणारा लिट्टे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन् आज श्रीलंका सैन्याने केलेल्या गोळीबारात ठार झाला. प्रभाकरनला ठार मारल्याचा दावा श्रीलंकेच्या लष्कराने केला आहे. त्यामुळे भारतालाही मोठाच दिलासा मिळाला आहे.
प्रभाकरन् ठार झाल्याने गेल्या ३० वर्षांपासून श्रीलंकेत सुरू असलेल्या युध्दावर आता पडदा पडला आहे. या संघर्षात आतापर्यंत ७० हजारांवर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लिट्टेच्या या संघर्षात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह अनेक सिंहली तसेच तामिळ नेत्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात श्रीलंका सैन्याच्या प्रवक्त्याने अधिक माहिती देताना सांगितले की, प्रभाकरन व त्याच्या सहकाऱ्यांना शेवटच्या टप्प्यात चारही बाजूंनी घेरलेले असताना प्रभाकरनने हा घेरा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीलंका सैन्याच्या विशेष पथकाने केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ५४ वर्षीय प्रभाकरन आपल्या काही विश्वासू सहकाऱ्यांसह एक व्हॅन व एका ऍम्ब्युलन्समधून पळून जाण्याच्या तयारीत असताना मुल्लईतिवू येथे श्रीलंका सैन्यातील विशेष पथकाने या कारच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभाकरनचा मुलगा चार्लस अँथोनी व प्रभाकरनचे अत्यंत विश्वासू असे प्रमुख तीन नेते पोट्टू अम्मान, सुसाई व नादेसान ठार झाले आहेत. असे असले तरी या बंडखोरांच्या प्रेतांच्या डीएनए चाचणीनंतरच श्रीलंका लष्कराकडून याची अधिक़ृत घोषणा केली जाईल. पोट्टू अम्मान हा लिट्टेच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख होता तर सुसाई समुद्री शाखेचा प्रमुख होता. असे असले तरी लिट्टे प्रमुख प्रभाकरनचे काय झाले यासंदर्भात मात्र अद्यापही उलटसुलट चर्चा सुरूच आहे.
दोन तासांच्या चकमकीनंतर प्रभाकरनचे शव व्हॅनमधून बाहेर काढण्यात आले व ओळखण्यात आले, असे हा प्रवक्ता म्हणाला. आम्ही प्रभाकरनला ठार मारले आहे, असे माझ्या सैन्य अधिकाऱ्यांनी मला सांगितल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान रत्नसारी विक्रमसिंघे यांनी म्हटले. लिट्टे प्रमुख प्रभाकरन ठार झाल्याचे वृत्त समजताच राजधानी कोलंबोसह देशात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. स्वतंत्र तामिळ राज्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून द. आशियात सुरू असलेला हा प्रदीर्घ असा सशस्त्र संघर्ष समाप्त झाला आहे.

अखेर अडवाणीच विरोधी पक्षनेते

भाजप नेत्यांची ठाम भूमिका
नवी दिल्ली, दि. १८ : भारतीय जनता पक्षाचे संसदीय मंडळ, महामंत्री व सर्व भाजप मुख्यमंत्री यांच्या ठाम भूमिकेनंतर भाजपनेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी राहण्यास आज आपली मौन संमती दिली.
श्री. अडवाणी यांच्या ३० पृथ्वीराज रोड या निवासस्थानी आज सकाळी ११ वा. भाजप संसदीय मंडळ व भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली. बैठकीच्या प्रारंभीच पक्षाध्यक्ष श्री. राजनाथसिंग यांनी अडवाणी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर राहावे, अशी भूमिका घेतली.
राजनाथसिंगांच्या या भूमिकेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडुरुप्पा, हिमाचलचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, उत्तराखंडचे भुवनचंद्र खंडुरी तसेच सर्वश्री व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, अनंतकुमार, गोपीनाथ मुंडे प्रभृतींनी अडवाणी यांनी या संकटाच्या समयी पायउतार होऊ नये, अशी भूमिका घेतली. बैठकीत उपस्थित असलेले डॉ. मुरली मनोहर जोशी व श्रीमती सुषमा स्वराज यांनीही अडवाणी यांनी या पदावर कायम राहावे, असे सांगितले.
शनिवारच्या पराभवानंतर सायंकाळी श्री. अडवाणी यांनी लोकसभेतील नेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काल सकाळपासून पक्षाचे नेते त्यांना भेटून त्यांनी या क्षणी असा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करीत होते. "आज तुम्ही नेतेपद सोडल्यास पक्षाचे नुकसानच होईल, तसा निर्णय मुळीच घेऊ नका,' असे पक्षाचे नेते त्यांना भेटून सांगत होते. पक्षाच्या काही नेत्यांनी काल परस्परांशी चर्चा करून आज सकाळी मुख्यमंत्री व संसदीय मंडळाच्या बैठकीत या आशयाचा ठराव आणल्याचा निर्णय घेतला व आजच्या बैठकीत तसा ठराव पारित करण्यात आला. दोन तास झालेल्या या बैठकीत स्वत: अडवाणी एक शब्दही बोलले नाहीत, असे समजते.

सरकार स्थापनेची प्रक्रिया आजपासून, मनमोहन सिंग यांना नेता निवडणार

नवी दिल्ली, दि. १८ : केंद्रात संपुआचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया उद्या मंगळवारपासून सुरू होत असून उद्या कॉंग्रेस सांसदीय मंडळाची बैठक बोावण्यात आली आहे. या बैठकीत डॉ. मनमोहनसिंग यांची नेतेपदी औपचारिक निवड करण्यात येणार आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी ही माहिती दिली.
संपुआच्या निवडणूकपूर्व घटक पक्षांची बैठक येत्या २० तारखेला बोलावण्यात आली असून त्यात सरकार स्थापन करण्याबाबत विचारविमर्श करण्यात येणार आहे. त्यानंतर संपुआ केंद्रात सरकार स्थापण्याचा दावा राष्ट्रपतींकडे सादर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

'ग्रुप ऑफ सेव्हन'च्या एकीला सुरुंग?

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला मिळालेल्या यशामुळे उत्साहित झालेल्या राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी आता सरकारमधील मतभेदांवर तोडगा काढण्याची नवी योजना आखली आहे, असे समजते. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या बिगरकॉंग्रेस "ग्रुप ऑफ सेव्हन' गटातील नेत्यांच्या एकीला सुरुंग लावून या गटाचे "उपद्रवमूल्य' तात्काळ संपवण्याचा चंगच काही कॉंग्रेस नेत्यांनी आखला असून त्यासंदर्भात व्यूहरचना आखण्याचे कामही सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अपयशामुळे निर्माण झालेल्या अनुकूल स्थितीचा लाभ घेऊन राज्यातही कॉंग्रेसचे वारे पसरवण्याची शक्कल काही नेत्यांनी लढवली आहे. राज्यातील आघाडी सरकारात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांनी कडक धोरण अवलंबिण्याची गरज असल्याचे मत त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीहून परतल्यावर मंत्रिमंडळ फेररचनेबाबत ठोस भूमिका ते घेणार असल्याचेही वृत्त कॉंग्रेस गोटात पसरले आहे. सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुदिन ढवळीकर यांच्या मडकई मतदारसंघातून भाजपला भरघोस मताधिक्य मिळाल्याचे कारण आता त्यांच्या विरोधकांकडून पुढे केले जात आहे. नावेली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही यावेळी कॉंग्रेसला केवळ अल्प मतांची आघाडी मिळाल्याने चर्चिल यांनीही सार्दिन यांच्याविरोधात काम केल्याची भावना पसरली असल्याने या दोघांही नेत्यांची मंत्रिपदे काढून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ढवळीकरबंधु हे सध्या केवळ आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आश्रयावर आघाडी सरकारात टिकून आहेत. सुदिन यांच्या मंत्रिपदाला धोका संभवल्यास विश्वजित यांच्याकडून विरोध होईल,अशी संभावना असल्याने आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाच कॉंग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव सादर करण्याचा विचारही सुरू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी हा प्रस्ताव कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्यामार्फत पुढे करण्याचा विचारही सुरू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विश्वजित कॉंग्रेसमध्ये आल्यास आपोआप या गटाचे वर्चस्व संपुष्टात येईल असाही विचार केला जात आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सध्या दिल्लीत आहेत. ते गोव्यात परतल्यावर मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय प्रामुख्याने चर्चेला येणार अशी माहिती कॉंग्रेस पक्षातील सूत्रांनी दिली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना पुन्हा मंत्रिपदी आरूढ करण्याबरोबर उपसभापती मावीन गुदिन्हो यांचाही मंत्रिपदासाठी विचार करावा,अशी मागणी पुढे येत आहे. चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने त्यांचे भवितव्य सभापती प्रतापसिंग राणे यांच्यावर अवलंबून आहे. सरकारच्या अंतर्गत कलहामुळे राज्यात कॉंग्रेसची होत असलेली बदनामी यापुढे अजिबात चालू देऊ नये,असेही यावेळी ठरवण्यात आल्याचेही कळते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक काळात घेतलेली संभ्रमित भूमिका व स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे निर्माण केलेले वारे यामुळे त्यांचे महत्वही कमी झाले आहे. संपुआचे ते घटक जरी असले तरी त्यांना आता पूर्वीसारखे महत्त्व नसणार या चिंतेने येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारही काही हिरमुसले आहेत.कॉंग्रेसशी जुळवून घेतल्यासच आपले स्थान सुरक्षित राहील,यामुळे त्यांच्याकडूनही यापुढे आढेवेढे घेतले जाणार नाही,असेही संकेत मिळत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री कामत यांना श्रेष्ठींकडून मिळाल्याने ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महानंदच्या पत्नीला हवा घटस्फोट!

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) : "सीरियल किलर' महानंद नाईक याची पत्नी पुजा नाईक हिच्यावर सतत आरोप होत असल्याने तिने घटस्फोट घेण्याचा विचार सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
महानंदाच्या "क्रुरकर्मा'मुळे त्याची पत्नी पुजा नाईक हिला माहेरी येण्यास मज्जाव करण्यात आल्याने आणि जमावाकडून हल्ला होण्याची भिती असल्याने "बायलांचो एकवोट'या महिला संघटनेने तिला स्वरंक्षण देण्याची जबाबदारी उचलली आहे. या खुनाच्या प्रकरणात तिचा हात असल्याचे जोपर्यंत उघड होणार नाही, तोपर्यंत आम्ही तिला संरक्षण देऊ आणि ज्यावेळी कायद्याला तिची गरज असेल त्यावेळी तिला पोलिसांच्या समोर उभे केले जाणार असल्याचे आव्हडा व्हियेगस यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
शिरोडा येथे पतीचे घर जाळण्यात आल्याने पुजा सावर्डे येथे आपल्या माहेरी राहायला गेली होती. यावेळी मध्यरात्री चार जण तिच्यावर हल्ला करण्यासाठी तेथे आल्याने माहेरचेही दार तिच्यासाठी बंद झाले, अशी माहिती श्रीमती व्हियेगस यांनी दिली. त्यामुळे तिच्यासमोर राहण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
माहेरची दारे बंद झाल्याने पुजाने गेल्या आठवड्यात सान्तिनेज पणजी येथील आश्रम गाठले. परंतु, त्या आश्रमात एका विशिष्ट धर्मातल्याच आणि कोणताही आधार नसलेल्या व्यक्तीला ठेवले जात असल्याने तेथेही तिला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ती रात्र तिने पणजी पोलिस स्थानकात काढल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. ती रात्र गेल्यानंतर पुन्हा तिच्यासमोर राहण्याची समस्या उभी राहिल्याने महिला संघटनेने तिच्या राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली.
आज सायंकाळी पणजी पोलिस पोलिस स्थानकात छोट्या मुलीसह पुजा नाईक व महिला संघटनेची प्रमुख दाखल झाली होती. परंतु, त्या नेमक्या कोणत्या कारणासाठी पणजी पोलिस स्थानकावर आल्या होत्या याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. पुजाने दोन आठवड्याची रजा काढली असून तिची राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती यावेळी श्रीमती व्हियेगस यांनी दिली.

Monday 18 May, 2009

सरकार स्थापनेसाठी हालचालींना जोर

संपुआला आवश्यकता १२ खासदारांची

नवी दिल्ली, दि. १७ - लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी कोणाचे सहकार्य घेणार, याकडे संपुआच्या जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचे सरकार गठित करण्यासाठी अवघ्या १२ खासदारांची आवश्यकता कॉंग्रेसला आहे.
म्हणूनच हे १२ खासदार कोणत्या पक्षातील असतील, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुकीत साथ सोडून गेलेले लालू, पासवान आणि मुलायम यांना मंत्रिमंडळात कोणतेही स्थान देऊ नये अशी जोरदार मागणी आज रविवारी झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत अनेक नेत्यांनी केल्यामुळे, कॉंग्रेस पक्ष कोणाचे सहकार्य घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
कॉंग्रेसला मोठ्या संख्येने जागा मिळाल्यानंतर आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसताच पदाच्या लालसेने कॉंग्रेससोबत जाण्यासाठी अनेक लहानमोठ्या पक्षांनी कॉंग्रेसचे गुणगान करीत आपली बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे, हे विशेष.
विजय मिळाल्यानंतर सायंकाळी पत्रपरिषदेत बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, अनेक लहान पक्ष व अपक्ष खासदार आमच्यासोबत येण्यास तयार आहेत, असे संकेत दिले होते. तर, अनेक पक्षांचे नेते अजूनही सातत्याने फोनवरून सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्याशी संपर्क साधत आहेत.
कॉंग्रेस अध्यक्षा व संपुआ प्रमुख सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पक्षाचे राजकीय सचिव अहमद पटेल, संरक्षणमंत्री ए.के.ऍण्टोनी, सरचिटणीस राहुल गांधी या कॉंग्रेसी नेत्यांसह राजद नेते लालू प्रसाद यादव, लोजपा प्रमुख रामविलास पासवान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजवादी पार्टी, डीएमके (द्रविड मुनेत्र कडघम), तृणमूल कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचे नेते उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित नेत्यांना कॉंग्रेसने सांगितले की, आम्ही गृह, संरक्षण आणि अर्थखाते स्वत:कडे ठेवणार असून इतर खात्याबाबत तडजोड होऊ शकते. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव या दोघांनीही रेल्वे मंत्रालयाची मागणी केली. कॉंग्रेसने लालूंना ग्रामीण विकास मंत्रालय स्वीकारण्याबाबत विचार करावा अशी सूचना केली. त्याचवेळी डीएमकेने आपल्याला सात खाती मिळतील की नाही याची चाचपणी केली. अखेर सविस्तर चर्चेअंती कार्यकारिणीने मनमोहन सिंग यांना सभागृहाचे नेते आणि सोनिया गांधी यांना पक्षाच्या तसेच संपुआच्या नेतेपदी निवडण्यासोबतच सत्तास्थापनेसाठी सोमवारी पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
सोनिया गांधींनी यानंतर लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचप्रमाणे अन्य घटक पक्षांसोबतही स्वतंत्र चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपुआला बहुमतासाठी आणखी केवळ १२ खासदारांची आवश्यकता असून त्यांच्याकडे अनेक पर्यायही आहेत. पहिला पर्याय सपा असून त्यांच्याकडे २२ खासदार आहेत. यात संपुआचे २६० खासदार मिळविले तर हा आकडा २८२ पर्यंत पोहोचतो. हा सर्वात सहज पर्याय असू शकतो. परंतु राकॉंचा विरोध बघता, ही शक्यता फारच कमी वाटते. अशात कॉंग्रेसला राजद ४, टीआरएस २, जेडीएस ३, एआयएमआयएमच्या एका खासदाराचे सहकार्य मिळू शकते. यांच्यासह कॉंग्रेसकडे २७० खासदार राहतात. सरकार स्थापण्यासाठी अपक्ष दिग्वीजय सिंग आणि सिंहभूम येथील अपक्ष मधु कोडा यांचेही समर्थन मिळू शकते. हा आकडा २७२ वर पोहोचतो. असे असले तरी सोनियांनी राजद आणि सपालाही चर्चेसाठी आमंत्रित केले होते.

संघनेत्यांनी घेतली अडवाणींची भेट

नवी दिल्ली, दि. १७ ः भाजपच्या अनपेक्षित पराभवानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली व पराभवाच्या कारणावर चर्चा केली. अडवाणी यांनी पद सोडण्याचा अथवा निवृत्त होण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबाबत संघाने त्यांना कोणताही सल्ला दिलेला नाही, असे रा.स्व.संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकारांना सांगितले. विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी स्वतः व भाजपने घ्यायला हवा, याबाबत संघ कोणतेही मत व्यक्त करणार नाही, असे श्री. माधव यांनी स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी, सुरेश सोनी व भय्याजी जोशी यांनी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
भाजपचा पराभव धक्कादायक असून, त्यावर विचारविनिमय करून पक्ष नेतृत्वाने योग्यवेळी निर्णय घ्यावा, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पक्षात युवानेत्यांना वरचे स्थान दिले जाईल का, असा प्रश्न त्यांना पत्रकाराने विचारला होता. भाजपच्या पराभवाचे कारण शोधण्यासाठी संघाने समिती नेमल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.
दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी अडवाणी हेच आमचे नेते असून, तेच यापुढे विरोधी पक्षनेते असतील, असे सांगितले तर अडवाणी यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत मुरलीमनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे.

ताळगाव येथे हल्ल्यात तीन वाहनांची मोडतोड

एक रहिवासी गंभीर जखमी

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - पसरेभाट ताळगाव येथे आज सकाळी शाम गावकर यांच्या घरात घुसून तीन वाहनांची मोडतोड व त्यांचे वडील सगुण गावकर(६५) यांच्यावर लोखंडी सळीने वार करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपाखाली शेजारी राहणाऱ्या नीलेश च्यारी ऊर्फ झिलू (३५) याच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी निलेश च्यारी याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. या घटनेनंतर त्याने पळ काढल्याने तो हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्री. गावकर यांच्या घरावर सकाळी सहा वाजता हा हल्ला झाला. याची त्वरित माहिती पोलिसांना देऊनही पोलिस घटनास्थळी पोचले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. सुमारे १० वाजता पोलिसांनी याठिकाणी भेट देऊन पंचनामा केला.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, आज सकाळी सुमारे सहा वाजता नीलेश एक लोखंडी सळी घेऊन तक्रारदार शाम याच्या घरात घुसला. यावेळी त्याने घराच्या बाहेर उभ्या करून ठेवलेल्या वाहनांची नासधूस केली. यात होंडा सिटी जीए ०७ सी ९७०८, वॅगनर जीए ०१ एस ९७०८ व एक डियो जीए ०४ बी ४५५१ या वाहनांची मोडतोड केली. यावेळी सगुण गावकर धावत बाहेर आले असता त्यांच्यावरही लोखंडी सळीने हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मारहाण होत असल्याने अडवण्यासाठी आलेला शाम गावकर यांनाही मारहाण करण्यात आली. यात सगुण गावकर जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याविषयीची अधिक तपास साहाय्यक उपनिरीक्षक आमोणकर करीत आहेत.

सासष्टीत ५ मतदारसंघांत भाजपच्या मतांत वाढ

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात जरी भाजपला पराभव पत्करावा लागलेला असला तरी त्याचे मिशन सालसेत काही प्रमाणात यशस्वी झाले असून एके काळी सासष्टीत अवघ्या दोन मतदारसंघांत असलेले त्या पक्षाचे वर्चस्व पाचवर गेल्याचे कालच्या मतमोजणी कोष्टकातून दिसून येत आहे. अर्थात फातोर्डा वा मडगाव सारखा मतदारसंघ वगळता त्याला स्वबळावर जरी विजय मिळविता येणार नसला तरी कॉंग्रेसमध्ये जर भाऊबंदकी माजली तर मात्र त्याचा लाभ या मतदारसंघांत भाजपला होऊ शकतो असेच कालच्या मतमोजणीचा आलेख दर्शवितो.
अर्थात सदर आलेखांतील बदलामागील कारणे अनेक आहेत व त्यातील प्रमुख कारण आहे ते मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे. मडगावातील कॉंग्रेस उमेदवाराची आघाडी घटून ती अवघ्या दीड हजारावर येण्याचे तेच कारण आहे. दिगंबर कामत यांनी ते भाजपात असताना आपला मतदारसंघ आपणाला भविष्यात सुरक्षित व्हावा हा दूरगामी विचार करून फातोर्डांतील प्रभाग क्र. १० हा भाजप मतदारांचे प्राबल्य असलेला भाग मडगावात समाविष्ट करून घेतला होता पण आज ते कॉंग्रेसमध्ये असल्याने त्यावेळची त्यांची क्लृप्ती आज त्यांच्या अंगलट आली आहे.
एकेकाळी त्यांचे उजवे हात गणले जाणारे एक उद्योजक सध्या त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. ऐन निवडणूक प्रचार काळात ते देशाबाहेर गेले व मतदानकाळात परतले त्यांनी कॉंग्रेसविरुध्द केलेले काम मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आघाडी कमी करती झाली आहे. मडगावात भाजपची मते वाढण्याचे ते एक प्रमुख कारण मानले जाते.
यावेळी कुडतरी, कुंकळ्ळी व नावेली मतदारसंघातील भाजपाची मते वाढण्यामागेही असेच फॅक्टर कारणीभूत आहेत. संपूर्ण घोगळ वसाहत परिसर कुडतरी मतदारसंघात घातला गेला व तेथील एकगठ्ठा भाजप मतदारांचा प्रभाव कुडतरीतील कौलावर पडला एरवी तेथे भाजप मतदार नगण्य होते, त्यातच कॉंग्रेमधील उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वितंवादाचा लाभ त्या पक्षाला झाला व त्याची मते वाढली.
नावेलीचा जो भाग बाणावलीत टाकला गेला आहे तो कॉंग्रेसवाल्यांचाच मानला जातो त्यामुळे बाणावलीतील कॉंग्रेस मतदार वाढले तर उलट नावेलीतील भाजप मतदारांचे वाढलेले प्रमाण यावेळी स्पष्टपणे जाणवून आले.
कुंकळ्ळीत जरी भाजप समर्थक उठून दिसत असले तरी त्यांच्या संख्येवर असलेली मर्यादा बाळ्ळी व आंबावली हा भाजप समर्थकांचा भाग कुंकळ्ळीत समाविष्ट केल्याने तेथील भाजपाची मतें वाढलेली आहेत पण त्यांची संख्या स्वबळावर विजय मिळविण्याइतकी नाही पण कॉंग्रेस दुभंगलेली असली व ते आपसात लढत राहिले तर त्यावेळी भाजपची सरशी होऊ शकते .
मात्र वेळ्ळी, बाणावली व नुवे या मतदारसंघांत भाजप आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. तसेच या तिन्ही मतदारसंघांनी काल पिछाडीवर गेलेले सार्दिन यांचे तारू सावरून त्यांना विजयाप्रत नेले असे दिसून आले. या एकंदर परामर्षावरून भाजपाने सासष्टीतील आपली उपस्थिती दोन वरून पाच विधानसभा मतदारसंघाप्रत नेली हे दिसून येते.

लोकसभेत प्रथमच दिसणार चार गांधी!

नवी दिल्ली, दि. १७ - अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या १५ व्या लोकसभेत प्रथमच गांधी घराण्यातील चार जण एकाच वेळी दिसणार आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतीय राजकारणावर गांधी-नेहरू घराण्याचा प्रचंड प्रभाव राहिलेला आहे. तेव्हापासून आजतगायत बहुतांशवेळा एक तरी गांधी लोकसभेत आहेतच. यावेळी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल, मनेका यांच्यासह वरुणचाही या सर्वोच्च नागरी सभागृहात प्रवेश होणार आहे. वरुण गांधी प्रथमच लोकसभेत येणार आहेत. त्यांचा प्रवेश झाल्याने या सभागृहात गांधी घराण्यातील एकूण चार सदस्य विविध बाकांवर दिसणार आहेत. त्यापैकी दोन सत्तापक्षात तर उर्वरित दोन विरोधी पक्षात दिसतील, एवढाच काय तो फरक राहील.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे १९५२ मध्ये सर्वप्रथम लोकसभेत आले. १९६४ पर्यंत ते सभागृहात कायम होते. या काळात त्यांचे जावई फिरोज गांधी बहुतांश वेळा त्यांच्यासोबत होतेच. त्यानंतर इंदिराजींचा प्रवेश झाला. संजय गांधींच्या रुपाने १९७७ मध्ये गांधी घराण्यातील तिसरी पिढी संसदेत आली. त्यांच्यातही पंतप्रधान होण्याचे सर्व गुण होते. पण, अकाली मृत्यूने एक खुल्या विचारांचा गांधी आपल्यातून निघून गेला. इंदिराजी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी इच्छा नसतानाही राजकारणात पाऊल ठेवले. ते १९८१ च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर १९९१ पर्यंत ते लोकसभेत होते.
संजय गांधी यांच्या पत्नी मनेका यांनी १९८९ च्या निवडणुकीपासून जनता दलाच्या माध्यमातून लोकसभेत प्रवेश केला. त्यावेळी त्या पिलीभीतमधून निवडून आल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ १९९९ मध्ये सोनिया गांधी या सातव्या सदस्य संसदेत दाखल झाल्या. २००४ मध्ये राहुल आणि आता २००९ मध्ये वरुण गांधी हे लोकसभेत विराजमान होणार आहेत.

Sunday 17 May, 2009

"संपुआ'चा आश्चर्यकारक विजय

राजकीय धुरिणांचे अंदाज चुकले; "रालोआ'ला १६३ जागा

नवी दिल्ली, दि. १६ ः देशभर ज्याची प्रतीक्षा केली जात होती, ते लोकसभा निवडणूक निकाल सकाळपासून घोषित होऊ लागल्यानंतर अनेक राज्यांमधून आश्चर्यकारक निकाल आल्याने राजकीय निरीक्षकांचे अंदाज कोसळले. कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने २५८ पर्यंत मजल मारली आहे. बहुमतासाठी फार तर १२-१५ खासदार त्यांना इकडून-तिकडून घ्यावे लागतील. ते मिळवणे फारसे कठीण नसल्याने या विजयाबद्दल कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला. डॉ. मनमोहनसिंग यांनाच पंतप्रधानपद देण्याचे त्या पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे आमच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील, पुढचा पंतप्रधान आम्ही ठरवू,अशा गर्जना निवडणुकीपूर्वी करणारे नेते तोंडावर आपटले. भाजपला अपेक्षेप्रमाणे यश न लाभल्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्नही विरले आहे.
जवळपास सगळ्याच "एक्झिट पोल'मध्ये यूपीएला आघाडी मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण संपुआ २५० पर्यंत जाईल, एवढी कल्पना कुणालाच नव्हती. त्यामुळे सकाळी-सकाळी निकालाचा कल पाहून सगळेच चकित झाले. दिल्लीसारखे स्वतःचे गड कॉंग्रेसने राखलेच, पण बिहार, उत्तर प्रदेशमध्येही त्यांनी चांगलीच मुसंडी मारली. लालूप्रसाद-रामविलास जोडी असो किंवा समाजवादी पक्ष, सगळ्यांना डावलून जनतेने कॉंग्रेस नेतृत्त्वावर विश्वास दाखवला. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने डाव्यांचे वर्चस्व मोडीत काढत त्यांची दादागिरी संपवली.
महाराष्ट्रात "मनसे'चा कॉंग्रेसला चांगलाच फायदा झाला. १७ जागा जिंकून कॉंग्रेस राज्यातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीची फारशी ताकद न दिसल्याने शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचा प्रश्नही आपोआपच निकाली निघला आहे. आता आठ-नऊ खासदारांच्या जोरावर पवार पंतप्रधानपद मागू शकत नाहीत. अन्य पक्षांनाही आता घोडेबाजाराला संधी उरलेली नाही.
लोकसभेत बहुमतासाठी २७२ जागा हव्यात. त्यापैकी २५० पर्यंत संपुआने आकडा गाठला आहे. त्यामुळे १० जनपथ वर सत्तास्थापनेची गणिते मांडायला सुरुवात झाली आहे.
"रालोआ'ची निराशा
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो आणि कॉंग्रेसचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया या पक्षाने व्यक्त केली आहे. इतक्या वाईट निकालाची अपेक्षा केली नव्हती, असे सांगून भाजपाध्यक्ष राजनाथसिंग यांनी आपली व्यथा बोलून दाखवली. रालोआ यावेळी फक्त १६० जागांपर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यामुळे त्यांना आणखी पाच वर्षं वाट पाहण्याशिवाय काहीच गत्यंतर नाही.
तिसऱ्या आघाडीचीही आजच्या निकालात चांगलीच बिघाडी झाले आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या बाता मारणारी ही मंडळी १०० पर्यंतही मजल मारू शकलेली नाहीत. त्यामुळे आता ते विरोधात बसतात, की पुन्हा कॉंग्रेससमोर लोटांगण घालतात, ते दिसेलच. तोंडघशी पडलेली लालू आणि त्यांचे मित्रपक्ष काय करणार हे पाहणेही मजेशीर ठरणार आहे.
राहुलना कॅबिनेट मंत्रिपद
राहुल गांधी यांना नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पद मिळणार हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसला मिळालेल्या यशात राहुल गांधींनी देशभरात केलेल्या झंझावाती प्रचाराचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत राहुल गांधींनी माझ्या कॅबिनेटचे सदस्य व्हावे अशी इच्छा खुद्द पंतप्रधानांनीच व्यक्त केली आहे. कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी नव्या सरकारमध्ये सामील होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनियांना विचारला. त्यावर नवीन सरकारमध्ये राहुलची काय भूमिका असेल याचा निर्णय पंतप्रधानच घेतील असे सोनियांनी स्पष्ट केले. त्यावेळी पंतप्रधान डॉ. सिंग म्हणाले, राहुलने माझ्या कॅबिनेटमध्ये सामील व्हावे यासाठी मी मागेही प्रयत्न केले होते. आता नव्या कॅबिनेटमध्ये सामील होण्यासाठी मी त्याला राजी करण्याचा प्रयत्न करेन.
कॉंग्रेसला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दुपारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
मतमोजणी सुरू झाल्यावर कॉंग्रेस आघाडीची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट होताच सकाळपासूनच १०, जनपथसमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली होती. ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी थांबत नव्हती. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून कॉंग्रेस मुख्यालय असलेल्या २४, अकबर रोडचा रस्त्यावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली होती.
सोनिया, डॉ.सिंग यांच्या प्रतिक्रिया
सोनिया गांधींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील शेकडो पत्रकार सकाळपासूनच १०, जनपथसमोर ठाण मांडून होते. अखेर चार वाजता पंतप्रधान मनमोहन सिंग १०, जनपथवर आले. आणि सोनियांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले, देशाच्या नागरिकांनी त्यांचे मत अगदी स्पष्टपणे मांडले आहे. त्यांनी कॉंग्रेस पक्ष आणि सोनिया गांधीच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.
देशाला एक स्थिर, मजबूत आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये असलेले सरकार देण्यासाठी संपुआ वचनबद्ध असल्याचे पंतप्रधांनांनी यावेळी स्पष्ट केले.
देशाच्या विकासासाठी डाव्या पक्षांसमवेत सर्वच विरोधी पक्षांनी भूतकाळ विसरून एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. लोकांना त्यांच्या भल्याचे काय आहे ते चांगले माहित आहे असे सांगत कॉंग्रेसला विजयी केल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मतदारांचे आभार मानले. २००४ साली आम्ही किमान समान कार्यक्रमात लोकांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आमचे कार्य लोकांना आवडले असे सोनिया म्हणाल्या.

श्रीपाद यांची हॅट्ट्रिक, सार्दिनही विजयी

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या आज झालेल्या निकालाअंती गोव्यातील दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांनी आपले स्थान अबाधित ठेवत विजयी परंपरा राखण्यात यश प्राप्त केले. उत्तरेत भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांच्यावर केवळ ६३५३ मतांनी आघाडी घेत ऐतिहासिक "हॅट्ट्रिक' साधली, तर दक्षिणेत कॉंग्रेसचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी पक्षांतर्गत बंडाला चोख उत्तर देत आपले प्रतिस्पर्धी भाजपचे ऍड. नरेंद्र सावईकर यांच्यावर १२,५१६ मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे उत्तरेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तर दक्षिणेत युगोडेपा पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याने श्रीपाद व सार्दिन यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
आज सकाळी नियोजित वेळी दोन्ही ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ झाला. उत्तरेत व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय तर दक्षिणेत रामनाथ कारे कायदा महाविद्यालयात मतमोजणीचे काम हाती घेण्यात आले होते. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. उत्तरेत दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीस बारा हजार मतांच्या आघाडीवर असलेल्या श्रीपाद नाईक यांची आघाडी हळूहळू कमी होऊन पाच ते सहा हजारांपर्यंत पोचल्याने भाजप नेते अस्वस्थ बनले होते तर दक्षिणेत सुरुवातीस भाजपचे ऍड. सावईकर यांना मिळालेल्या मतांमुळे कॉंग्रेसवाल्यांचे धाबेच दणाणले होते.
उत्तर गोव्यात भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांचा विजय निश्चित असल्याची जोरदार हवा होती, मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांनी अल्पावधीतच जबरदस्त आव्हान उभे केल्याने ती ओसरत असल्याचे दिसून आले. देशप्रभूंच्या मागे सत्तरीचे राणे पितापुत्र ठामपणे उभे राहिल्याने भाजप गोटातही काहीशी अस्वस्थता पसरली होती. विश्वजित राणे यांनी पर्ये व वाळपई मतदारसंघातून देशप्रभू यांना ११,६१२ मतांची आघाडी मिळवून दिली. डिचोली, साखळी व मये मतदारसंघात मात्र त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. या तिन्ही मतदारसंघात श्रीपाद यांनी देशप्रभू यांच्यावर ९६०० मतांची आघाडी घेतली व हीच आघाडी अखेर त्यांना फायदेशीर ठरली. उत्तरेतील उर्वरित वीस मतदारसंघांपैकी दहा मतदारसंघात श्रीपाद यांनी आघाडी मिळवण्यात यश मिळवले. मगोकडे असलेल्या प्रियोळ मतदारसंघातही भाजपला ४८४९ मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे मगोच्या या मतदारसंघात मगोपेक्षा भा.क.प.ला जास्त मते मिळाली. जितेंद्र देशप्रभू हे खुद्द त्यांच्या पेडणे तालुक्यातून आघाडी मिळवण्यात अपयशी ठरले. पेडण्यातील दोन्ही मतदारसंघात मिळून श्रीपाद यांनी त्यांच्यावर ३९४ मतांची आघाडी घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या एकमेव थिवी मतदारसंघातून देशप्रभू यांना केवळ १५८ मतांची आघाडी मिळाली. ताळगाव, कळंगुट, सांतआंद्रे, हळदोणा, सांताक्रुझ, कुंभारजुवा आदी आघाडी सरकारकडे असलेल्या मतदारसंघातूनही देशप्रभू यांना अल्प का होईना पण आघाडी मिळवून देण्यात संबंधित आमदारांनी यश मिळवले. भाजपच्या विधानसभेतील मतदारसंघातून श्रीपाद यांना आघाडी मिळवून देण्यात स्थानिक आमदार यशस्वी ठरले खरे परंतु विश्वजित राणे यांनी लक्ष्य बनवलेल्या डिचोली, मये व साखळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेली सचोटी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. २००४ सालच्या तुलनेत राष्ट्रवादीला ४२,७३४ मते जास्त मिळाली तर भाजपला ७१२६ मते कमी पडली.

दक्षिणेत अखेर सार्दिन यांनी बाजी मारलीच
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात युगोडेपाचे उमेदवार माथानी साल्ढाणा "फॅक्टर' पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याने अखेर कॉंग्रेसचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी हा मतदारसंघ राखला. भाजपचे नवोदित उमेदवार ऍड.नरेंद्र सावईकर यांच्यावर त्यांनी १२५१६ मतांनी विजय मिळविला. सार्दिन यांना १,२७,४९४ तर ऍड. सावईकर यांना १,१४,९७८ मते मिळाली. युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांना अवघी १६,७२७ मते मिळाली. एरवी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही भाजपने यावेळी कॉंग्रेसला दिलेली टक्कर विशेष उल्लेखनीय ठरली. फोंडा, मडकई, मुरगाव, वास्को, कुडचडे, सावर्डे, सांगे व काणकोण अशा आठ मतदारसंघात जरी भाजप उमेदवाराने आघाडी घेतली असली तरी सासष्टीतील वेळ्ळी, नुवे, कुडतरी, बाणावली, कुंकळ्ळी व कुठ्ठाळी मतदारसंघांतील कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी पक्षाला भक्कम पाठिंबा दिल्याने सार्दिन यांचा विजय सुकर झाला. निवडणुकीपूर्वी फातोर्डा, नावेली, बाणावली आदी मतदारसंघात जे भाजपसाठी अनुकूल चित्र दिसत होते ती केवळ हवाच होती हे आज निकालाअंती स्पष्ट झाले. शिरोडा, फातोर्डा सारखे मतदारसंघ भाजपला अपेक्षेप्रमाणे आघाडी देऊ शकले नाहीत. पण, नावेली, मडकई, फोंडा येथून मिळालेल्या मतांमुळे कॉंग्रेसचे आघाडीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात खुंटले. ऍड. सावईकर यांना गृहमंत्री रवी नाईक यांच्या फोंडा मतदारसंघातून २०३७ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीत सुदिन ढवळीकर यांची प्रमुख भूमिका असल्याने भविष्यात रवी नाईक यांच्यासमोर जबरदस्त आव्हान निर्माण होणार, याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. मडकई मतदारसंघातून ऍड. सावईकर यांना ६२४६ मतांची आघाडी मिळाली. भाजपकडे असलेल्या शिरोडा मतदारसंघात मात्र सार्दिन यांनी केवळ १०४ मतांची आघाडी मिळवली.
आज सकाळी कारे कायदा महाविद्यालय व दामोदर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील ७ सभागृहांत मतमोजणी सुरू झाली. भाजपचे नरेंद्र सावईकर, फ्रांसिस सार्दिन त्यांचे पुत्र यावेळी हजर होते. अन्य कुणीही उमेदवार याठिकाणी दिसत नव्हते. जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे, पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यावेळी मतमोजणीवर नजर ठेवून होते.
टपाल मतदानांत सार्दिन यांना ९२, सावईकर यांना १६२ मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. फोंडा तालुक्यातील मतमोजणीनंतर आघाडीवर असलेले ऍड. सावईकर सासष्टीतील निकालानंतर मागे पडत गेले. कुठ्ठाळी, नुवे येथील मतमोजणी नंतर ते बरोबरीत राहिले व सावर्डे, सांगे येथील मतमोजणी नंतर त्यांना परत आघाडी मिळाली. बाणावली, कुंकळ्ळी व वेळ्ळीतील कॉंग्रेसच्या आघाडीमुळे ते पिछाडीवर पडत गेले. मतमोजणीची सुरुवात भाजपच्या आघाडीने झाल्याने याठिकाणी कॉंग्रेसचे प्रमुख नेते फिरकलेच नाहीत. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर दाखल झाले. आमदार बाबू कवळेकर, वीजमंत्री आलेक्स सिकेरा यापूर्वी दाखल झाले. गेल्या नोव्हेंबर २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे फ्रांसिस सार्दिन यांना ११८५८३ मते पडली होती तर भाजपचे विल्फ्रेड मिस्कीता यांना ७७६८१ मते पडली होती. या खेपेला गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपने ३७२९७ मते जादा मिळवली तर कॉंग्रेसला फक्त ८९११ मते जादा पडली.

कवेशला नाहक गुंतवण्याचा प्रयत्न

मूर्तिभंजन प्रकरणी थोरला भाऊ महेंद्रचा दावा
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : राज्यात होणाऱ्या मूर्ती तोडफोड प्रकरणात कवेश गोसावी याला पोलिस नाहक गुंतवण्याचा प्रयत्न करीत असून या प्रकरणाची "सीबीआय' चौकशी करा, अशी मागणी कवेशचा थोरला भाऊ महेंद्र गोसावी यांनी केली आहे.
"पोलिस माझ्या भावाचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. पोलिस असे का करीत आहेत, हे कळण्यास मार्ग नाही. आम्ही नाथपंथी आहोत. कवेशसह आमच्या घरातील कोणीही देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. माझा भाऊ असले दुष्कृत्य करूच शकत नाही. कवेश निर्दोष आहे आणि मी हे फातर्पेकरणीच्या मंदिरात उभा राहून सांगू शकतो. अन्यथा पोलिसांनी मंदिरात येऊन कवेशच्या विरोधात पुरावे असल्याचे सिद्ध करावे,' असे आव्हान महेंद्र यांनी दिले आहे.
पोलिस पत्रकारांना हाताशी धरून खोट्या बातम्या पसरवत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यात कवेश लाजेने घराच्या बाहेरही गेला नाही. केवळ सकाळच्या वेळी काजू बागायतीत जाऊन येत होता. त्यानंतर तो घराबाहेरही पडत नव्हता. तुरुंगांत राहून आल्याने आणि आता त्याची लाज वाटत असल्याने यावेळी पहिल्यांदाच त्याने मतदानही केले नसल्याचे महेंद्र म्हणाला.
पोलिसांकडे त्याच्या विरोधात कोणतेच पुरावे नसताना कोणत्या आधारावर त्याला अटक केली आहे, असा प्रश्न महेंद्र यांनी विचारला. दोन महिन्यांपूर्वी गुडीपारोडा येथील मूर्ती मोडतोड प्रकरणात कवेशला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्याची ब्रेंन मॅपिंग आणि पॉलिग्राफी चाचणी करण्यासाठी त्याला बंगळूर येथे नेण्यात आले. त्याचे पॉलिग्राफी आणि ब्रेंन मॅपिंग करण्यात आले. त्याचा अहवाल मात्र पोलिसांनी अद्याप न्यायालयात सादर केलेला नाही, अशी माहिती महेंद्र यांनी दिली. अटक केलेल्या अल्लाबक्ष याची पत्नी या प्रकरणात असून ती आमची सावत्र बहीण आहे. त्यामुळेच कवेश तिच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. तथापि, अल्लाबक्षशी आमचा कोणताही संबंध नाही. एक मूर्ती तोडण्यासाठी त्याला पाच हजार मिळत होते, असे जे पोलिस सांगत आहे, ते ही खोटे आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला एक लाख मिळाल्याचे सांगितले होते. ते एक लाख त्याने कुठे ठेवले हे शोधण्यास पोलिसांना अपयश आल्याने आता पाच हजारच्या रकमेवर पोलिस आले असल्याचे महेंद्र म्हणाले. मूर्तीची मोडतोड कोण करतो हे उघड झालेच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. त्यासाठी पोलिसांनी कवेश याची नार्को चाचणी करावी, जेणे करून सत्य उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.